आज आपण अशा योजनेविषयी माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये शेतकरी कोंबड्या पाळून चांगली कमाई करू शकतात आणि सरकार त्यासाठी पैसेही देते. ही योजना कशी आहे, अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात – हे सगळं आपण एका मागोमाग समजून घेणार आहोत.
योजना म्हणजे काय?
या योजनेचं नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान.
या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना कोंबडी, बकरी, गाय, म्हैस अशा जनावरांना पाळण्यासाठी पैसे देते.
शेतीसोबत जर शेतकरी जनावरं पाळली, तर त्यांना जास्त पैसे मिळतात आणि घरखर्च चालवायला मदत होते.
सरकार कशी मदत करते?
शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यासाठी जर प्रकल्प सुरू करायचा असेल, तर त्या खर्चासाठी पैसे तीन प्रकारे मिळतात:
- ५०% पैसे सरकार देते.
उदाहरण: प्रकल्प १०० रुपयांचा असेल, तर सरकार त्यात ५० रुपये देते. - ४०% पैसे बँक कर्ज देते.
बँकेकडून ४० रुपये उधार मिळतात. - १०% पैसे शेतकऱ्याने स्वतः द्यावे लागतात.
म्हणजे १० रुपये शेतकऱ्याच्या खिशातून.
उदाहरण: जर एखाद्या शेतकऱ्याला २० लाखांचा कोंबडी पालन प्रकल्प करायचा असेल, तर फक्त २ लाख रुपये त्याला स्वतः द्यावे लागतात. बाकीचे १८ लाख सरकार व बँक मिळून देतील.
योजना कोण करू शकतो?
ही योजना करण्यासाठी काही अटी आहेत:
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- जनावरं ठेवण्यासाठी जागा असावी.
- थोडं पशुपालनाचं ज्ञान असावं.
- प्रकल्प ५० लाखांपेक्षा मोठा नसावा.
- महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्याकांना जास्त प्राधान्य दिलं जातं.
कोणते प्रकल्प करता येतात?
या योजनेत खालील प्रकल्प करता येतात:
- कोंबडी पालन (अंडी व मांसासाठी)
- देशी कोंबडी पालन
- शेळी पालन (दूध व मांसासाठी)
- मेंढी पालन (लोकर व मांसासाठी)
- गाय व म्हैस पालन (दुधासाठी)
- डुक्कर, ससा, बदक पालन
अर्ज करताना कोणते कागदपत्र लागतात?
- आधार कार्ड किंवा ओळखपत्र
- जमिनीचा पुरावा (सातबारा, प्रॉपर्टी कार्ड)
- जमिनीचे फोटो
- बँकेचं स्टेटमेंट
- प्रकल्प अहवाल
- पशुपालनाचा अनुभव (असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्र (हवे असल्यास)
- जात प्रमाणपत्र (हवे असल्यास)
प्रकल्प अहवाल म्हणजे काय?
प्रकल्प अहवाल म्हणजे आपण कोणता व्यवसाय करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती लिहून ठेवलेली कागदपत्रं. त्यामध्ये खालील गोष्टी लिहाव्या लागतात:
- कोणता प्रकल्प करणार?
- किती जनावरे असतील?
- एकूण खर्च किती?
- कमाई किती होईल?
- तयार माल कुठे विकणार?
- तोटा झाला तर काय करणार?
हा अहवाल नीट लिहिला, तर अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
अर्ज कसा करायचा?
- सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- प्रकल्प अहवाल तयार करा.
- जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात माहिती घ्या.
- अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करा.
- जवळच्या बँकेत कर्जासाठी बोला.
- अधिकारी प्रकल्प पाहायला येतील.
- प्रकल्प मंजूर झाल्यावर पैसे हळूहळू मिळतील.
योजनेचे फायदे काय?
- सरकारकडून ५०% अनुदान मिळतं.
- शेतकऱ्याला फक्त १०% पैसे द्यावे लागतात.
- मोठा प्रकल्प थोड्या पैशांत सुरू करता येतो.
- शेतीसोबत अजून एक कमाईचा मार्ग मिळतो.
जर शेतकऱ्याने ही योजना नीट समजून घेतली, सर्व कागदपत्रे पूर्ण केली आणि नियम पाळले, तर त्यांना चांगला व्यवसाय सुरू करता येतो.
कोंबडी पालन, बकरी पालन, शेळी पालन यामधून ते चांगली कमाई करू शकतात.
ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे.